Sunday, July 14, 2019

माझी पत्नी - ईश्वरी

          मी आणि माझी पत्नी ईश्वरी 

          २००८ पासून आज 14 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, नवीन संसार थाटला...कारण माझी प्रथम पत्नी कै.सौ.ऐश्वर्या हिच्या अकाली दुःखद निधनामुळे माझी मुलगी फक्त ४ वर्षांची असल्याने तिला कमालीचा मातृशोक झाला होता. म्हणून मला दुसरे लग्न करावे लागले. अर्थात मलाही सहचारिणी गेल्याचे अतोनात दुःख झाले होते. ही उणीव भरुन काढणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. शिक्षिका पत्नीच्या जाण्याने तिच्यासोबतच्या २००० ते २००७ पर्यंतच्या आठवणी उचंबळून येत होत्या. शाळा, मुलीची देखभाल, पत्नीचा वियोग यांचे व्यवस्थापन करणे मला जिकिरीचे झाले. मी विमनस्क झालो होतो..तिच्याशिवाय जीवन जगणे मला असह्य झाले होते. शाळेतून आल्यानंतर मी मला एका बंद खोलीत स्वतःला कोंडून घेत असे. आणि मार्च २००८ मध्ये माझ्या आयुष्यात दुसऱ्या पत्नीने ( राणी नारायण टिपुगडे - राधानगरी ) हिने प्रवेश केला. समायोजन होईपर्यंत एक वर्षाचा काळ लोटला. तिने माझ्या मुलीला हर्षदा ( छकुली ) हिला चांगलेच आपलेसे केले. तिने केलेले हे सहकार्य माझ्यासाठी अत्यंत मोलाचे असेच आहे. आज माझ्या पत्नीला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत...३३ व्या वर्षात पदार्पण करत असताना तिने गेल्या ११ वर्षात मला जे समजून घेतलेले आहे ती गोष्ट मला महत्त्वाची वाटते....पूर्वपत्नीला विसरु न देता ईश्वरीने मला जी साथ दिली आहे ती अखंड आहे...तिला तिचे पुढील आयुष्य वैभवशाली जाण्यासाठी मी अधिक जोमाने , प्रेमाने व जबाबदारीने वागण्यासाठी ईश्वर मला शक्ती देवो आणि आपणा सर्वांच्या सदिच्छा पाठिशी राहोत म्हणजे झाले.


No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...