आज आमच्या साईशचा वाढदिवस....माझ्या मोठ्या भाच्याचा मला सार्थ अभिमान आहे...तो एक चांगल्या मामाचा चांगला भाचा आहे...खूप आदर आहे मला त्याच्याबद्दल ...एवढं Higher शिक्षण घेऊनही त्याच्यामध्ये मीपणा नाही....तो आमचा आदर करतो...कारण अगदी लहान असतानाचा आमचा सर्वप्रथम भाचा आहे तो..
आम्हीही शिकत असताना त्याचा जन्म झाला..डी.एड. सुरु होते माझे तेव्हा...शाहिरी प्रशिक्षण , योगप्रवेश परीक्षा, मुलांचे क्लास घेणे, बाबांचे जेवण पोचवणे, दुकानात दाढ्या करणे ( पाय पोचत नसले तरी )...जराही जीवाला उसंत न देता कामे सुरु होती...ताईने एका गोंडस बाळाला जन्म दिला ही आमच्यासाठी तेव्हा अतिशय महत्त्वाची बाब होती...तेव्हा आमच्या घरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता..एक हलकेच आळस देणारं, भोकाड पसरुन रडणारं बाळ, टुकूर टुकूर माझ्याकडे बघणारं बाळ आम्हाला परमानंद देऊन गेलं होतं..त्याला मांडीवर घेतलं कि सगळा दिवसभराचा शीण निघून जात असे...मज्जा ..मज्जा होती..पहिल्यांदा त्याला घेताना भिती वाटत असे...पण नंतर अलगद उचलून घ्यायची सवय झाली...रडणारा बाळ गाणं म्हटल्यावर रडायचा थांबत असे...त्यामुळे मी गाणं म्हणण्याचा सपाटाच लावला...
बालगीतांपासून समूहगीतांपर्यंत सगळी गाणी माझी गाऊन संपत असत.म्हणायचा थांबलो कि आमचा गोट्या रडू लागे..मग पुन्हा माझ्या आवाजाचा रेडिओ गर्जू लागे...मग काही काळानंतर आमची ताई डोंबिवलीला राहायला गेली..मी त्यावेळी भावोजींची ताईला आलेली पत्रे वाचून भारावून जात असे...त्यांच्या सुंदर हस्ताक्षरातील पत्रे वाचताना ते जवळच असल्याचा क्षणभर भास होई...पण त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला कमालीचा आदर वाटू लागला...त्यांचे हसणे, बोलणे आम्हाला आवडू लागले होते...
ताईला मी सायकलवरुन स्टँडवर व स्टँडवरुन रेशनदुकानापर्यंत सोडण्याचे काम करत असे...साईशचा जन्म आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होता...भावोजींचे आणि ताईचे बाळाबरोबरचे प्रेमळ बोलणे मला गुदगुल्या करत असे...एवढे प्रेमळ भाषेतील शब्द आम्ही पहिल्यांदाच ऐकले होते...मला आमच्या घरातले बाळू म्हणायचे..हे नाव मला आवडत नसे...कारण रागाच्या भरात त्याचा उच्चार बाळग्या किंवा बाळगो असा केला जाई आणि मला ते नाव म्हणूनच अजिबात आवडत नसे...त्यानंतर साईश मोठा होत असताना त्याचं बालपण बघता आले तेव्हा तेव्हा आम्हाला ते पाहताना आनंदाच्या उकळ्या फुटत असत...असा माझा लाडका भाचा तुषार कधी हुशार झाला ते समजलेदेखील नाही...
एकदा तो पाटगांवात आला होता...तेव्हा तो ५ वी , ६ वीत असेल कदाचित ...मी त्याला सहज विचारले कि तू मोठेपणी कोण होणार आहेस...त्यावेळी त्याने दिलेले उत्तर आठवले कि अजूनही आम्हाला हसू येते...तो म्हणाला, बघूया आता मला माझे पप्पा - मम्मी काय बनवतात ते...ते उत्तर आज खरेच वाटते...
आई वडिलांनी त्याला जसा घडवला आहे..तसाच तो बनला आहे...तो एक अत्यंत हुशार मुलगा आणि समंजस भाचा असून तो ज्या क्षेत्रात जाईल त्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असे त्याला माझे उदंड आशीर्वाद आहेत...त्याचे भवितव्य उज्ज्वल असेल यांत मला किंवा कोणालाही तिळमात्रही शंका असायला नको.


