नुकत्याच परीक्षा संपल्या आहेत आणि सुट्ट्या सुरु होण्याचा हंगाम सुरु झाला आहे. मार्च , एप्रिल हे दोन महिने परीक्षांचे महिने म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोन महिन्यांची संपण्याची वाट सर्वच परीक्षार्थी करत असावेत.
आम्ही त्यावेळी परीक्षांच्या दिवसांत खूप अभ्यास करत असू. नेहमी पुस्तकांच्या सानिध्यात राहत असू. पुस्तके म्हणजे पाठ्यपुस्तके. ही पाठ्यपुस्तकेच आमचे मित्र झालेले होते. त्यांचा सहवास सतत लाभण्याचे ते दिवस आठवले की मस्त वाटते.
आता मुले अभ्यासाचा कंटाळा करताना दिसतात. पुस्तकांचा सहवास तर त्यांना नकोच असतो. काही अपवाद सोडले तर अनेकांना परीक्षेपुरता अभ्यास करताना पाहून खूपच वाईट वाटते. आजची मुले फक्त परीक्षार्थी झाली आहेत की काय ? परीक्षा आल्या कि अभ्यास करायचा एवढेच त्यांचे म्हणणे असते. वाचन करायला सांगितले तर त्यांना झोपा येतात. अभ्यासाची पुस्तके वाचणे तर त्यांच्या जीवावरच येते.
आज प्रसार माध्यमे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यावर अनेक प्रकारचे लिखाण उपलब्ध असते. मुलांना हे सर्व प्रकारचे वाचन करण्याची अनमोल संधी असते.